कृषीवार्ता

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलन..

Spread the love

इस्लामपुरः प्रतिनिधी.

शेतीला दिवसा काठी दहा तास वीज पुरवठा करण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे मागील दहा दिवसापासून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप शासना कडून या आंदोलनाची दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.यासाठी वाळवा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने
आज शुक्रवार दिनांक ४ मार्च रोजी वाळवा पंचायत समितीच्या समोर पेठ सांगली रोडवर रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी दिली,
जाधव पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना दिवसा १० तास दिवसा वीज द्या या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे महावितरणच्या कार्यालया समोर बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलनास बसले आहेत मात्र या आंदोलनाची दखल राज्य शासन घ्यायला तयार नाही. महावितरण शेतकऱ्यांचे विना सागता वीज तोडणी करत आहेत. या आंदोलनास प्रवक्ते अँड. एस्. यु. संन्दे, भागवत जाधव, आप्पासाहेब पाटील,जगन्नाथ भोसले,प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे, प्रकाश देसाई,प्रभाकर पाटील गुडाभाऊ आवटी, मराठा क्रांतीचे क्राँ.दिग्विजय पाटील, शहाजी पाटील, प्रदीप नांगरे, शहाजी पाटील,रमेश पाटील,अनिल करळे, खासेराव निबांळकर, सतोष शेळके, रविकिरण माने, राजाराम परिट,पंडित सपकाळ, शिवाजी मोरे, मधुकर डिसले,प्रकाश माळी, सुदर्शन वाडकर, आनंदा कदम, प्रताप पाटील, अभिजित नवले, निखिल मगदूम, सह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या आदोलनास मा. खा राजु शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी वाळवा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी उपस्थित राहावे.असे अवहान भागवत जाधव यांनी केले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!