वाकुर्डे खुर्द जळीतग्रस्त कुटुंबाला मदतीची गरज
शिराळा प्रतिनिधी
वाकुर्डे खुर्द येथील जनावरांच्या गोट्याला लागलेल्या आगीत तीन जनावरांची व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी दिली.
वाकुर्डे खुर्द (ता.शिराळा) येथे तुकाराम साळुंखे यांच्या जनावराच्या गोठ्यास आग लागून ३ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर मोठे नुकसान झाले त्याची पहाणी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रणधीर नाईक यांनी केली,
रणधीर नाईक पुढे म्हणाले ,वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा येथील तुकाराम साळुंखे यांच्या जनावरांच्या गोट्याला अचानक लागलेल्या आगीत तीन मोठी दुभती जनावरे व इतर शेती उपयोगी साहित्य व जनावरांचे शेड भस्मसात झाल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले असल्याने साळुंखे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे . आज जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. व संबंधित अधिकारी यांना संपर्क साधला घटनेच्या तात्काळ पंचनामा करावा शासनाची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सरपंच शांताराम जाधव , गजानन पाटील (महाराज), शैलेश पाटील, मोहन गुरव शामराव जाधव, राजू मेंढकर,पांडुरंग पाटील, विकास पाटील, शिवाजी सवादकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.