शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्र पेटला…
(वर्षाराणी दुर्गे डाकवे) पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेले बारा दिवस शेतकरी संघटनेचे आंदोलन कोल्हापूर येथे सुरू आहे. तरीही राज्य सरकारने दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना दहा तास वीज पुरवठा करा, या मागणीसाठी गेले बारा दिवस आंदोलन सुरू आहे. आमची मागणी रास्त आहे. ती सरकारने मान्य करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापुरात वीज मंडळाच्या कार्यालयापुढे गेले बारा दिवस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. राजू शेट्टी हे सत्ताधारी पक्षासोबत असले तरी त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी ते सरकार कोणाची असो? पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, या मागणीवर आहेत. शेतकऱ्यांना रात्रीचे शेतीला पाणी पाजावे लागत असल्याने शेतकऱ्यांना धोका निर्माण होत आहे. याकडे सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिवसाचे दहा तास वीजपुरवठा करावा. या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र आंदोलनाने पेटला आहे. दूध दरवाढ आसो किंवा उसाचा प्रश्न असो. तो रेटून धरून शेतकरी संघटनेने सोडला आहे. ऊस दरवाढीच्या आंदोलनात राजू शेट्टी यांनी स्वतःचे रक्त सांडले होते. यामुळे शेतकरी नेताना असे समजू लागले होते. मध्यंतरी शेतकरी संघटनेचा आवाज थंडावला होता. परंतु शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना दहा तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनेची खरी ताकत पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचे दिसून येते. पुन्हा एकादा शेतकरी संघटनेने आंदोलनाचे शस्त्र ऊगारले आहे. मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असे शेतकरी संघटनेने ठरवले आहे. येत्या चार दिवसात राज्य सरकार शेतकरी संघटनेचे नेत