खुंदलापूर प्रश्नावर माजी मंत्री शिवाजीराव नाईक व नागरिकांमध्ये चर्चा
खुंदलापुर येथील ग्रामस्थ आपले प्रश्नांबाबत नेत्यांच्या बरोबर थांबून पुनर्वसन होणेसाठी सविस्तर तयार केलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा केली यावेळी नेता व कार्यकर्ते यांचे जिव्हाळ्याचे संबंध काय असतात व प्रश्नांची तड काशी लावावी हे दिसून आले. मौजे खुंदलापूर येथील नागरिकांचा गेले अनेक वर्षे प्रलंबित आसलेला पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावाने एकमुखाने प्रस्ताव तयार केला असून तो प्रस्ताव पूर्णपणे वाचुन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आपली सही करून हा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यासाठी ग्रामस्थांना सूचना केल्या. पणुंब्रे – चरण रस्त्यावर हिराई राईस मिल येथे नाईक साहेब यांनी सदिच्छा भेट दिली .यावेळी माजी सरपंच तुकाराम रामचंद्र गावडे, तुकाराम नौलु गावडे, आकाराम गावडे, भगवान मस्के ,राम नाईकवडी ,ग्रा प सदस्य सत्तेज पाटील , बाबजी पाटील (खिरवडे) आदी मान्यवर उपस्थित होते.