स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 17 व 18 रोजी संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक व कारखाने बंद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 17 व 18 रोजी संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक व कारखाने बंद ची निवेदन क्रांती कारखाना सोनेरा कारखाना यांना देण्यात आले व कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले जर तोडणे वाहतूक बंद नाही झाली तर स्वाभिमानी स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी उपस्थित संदीप राजोबा सूर्यकांत मोरे बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील रोहित पाटील प्रकाश पाटील टि के सणगर शिंदे आबा बाळासो जाधव अजमुद्दिन मुजावर राजू माने गोरख महाडिक प्रकाश माळी आंदोलनातील प्रमुख मागण्या चालू उसाच्या गळीत हंगामाचे एक रकमी एफ आर पी अधिक साडेतीनशे रुपये तसेच मागील वेळी हंगामाचे एफ आर पी अधिक दोनशे रुपये तसेच साखर आयुक्ताने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही वजन काट्यावर वजन केलेले वजन ग्राह्य धरावे तसेच शेतकऱ्यांच्या प्रति टन ऊस बिलातून दहा रुपये कपात करून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी महामंडळाला कपात करून घेणार आहेत तरी कारखान्यांना ऊस तोडणी मजूर महामंडळामार्फत पुरवावे व त्यांची जबाबदारी महामंडळाने घ्यावी कारण आज अखेर ऊस उत्पादक शेतकरीच वाहतूक तोडणी कंत्राटदार आहेत परंतु तोडणी न आल्याने व पळून गेल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांच कुटुंब उध्वस्त झालेली आहेत व बऱ्याच वाहतूक कंत्राटदारांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेले आहेत या व इतर विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 17 व 18 रोजी सांगली कोल्हापूर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोडणी वाहतूक व कारखाने बंद आंदोलन उग्र स्वरूपात होणार आहे