सणासुदीच्या तोंडावर तीन महिन्यांपासून पगार नाहीत, मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःची नैतिकता तपासा.
मिलिंद अच्युत.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ ऑक्टोबर.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे ऐन सणासुदीच्या तोंडावर तीन महिन्यांपासून चे पगार प्रलंबित ठेवल्यामुळे विद्युत विभागासारख्या जोखीम असणाऱ्या व शहराची नाळ विद्युत रोषणाईने जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ऐन सणासुदीच्या काळात अंधकारमय सण साजरा करावा लागणे हे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे प्रतिपादन मावळ तालुका काँग्रेसचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले आहे.
विद्युत विभागातील कर्मचारी अत्यंत कष्ट करून तळेगाव शहरातील रोषणाई आबादीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सदर कर्मचारी हे तळेगाव शहराची शान असून अशाच कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे असा सवाल मिलिंद अच्युत यांनी केला आहे.
तळेगाव शहरातील जबाबदार व्यक्तींनी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दसरा सणानिमित्त विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून मिठाईचे वाटप करावे हीच खरी सणसुद असून दातृत्वाचे सीमोल्लंघन दानशूर व्यक्तींनी करून आपल्या विद्युत कर्मचारी बांधवांसोबत सण साजरा करावा.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात गहाळ कारभार सुरू असल्याचा प्रकार म्हणजेच विद्युत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असणारे पगार होय.तळेगाव दाभाडे नगर परिषदेत कोणाचा कोणाला कामासंदर्भात तपास नसून, सर्व ठिकाणी भोंगळ कारभार सुरू आहे, मुख्याधिकारी एन के पाटील मोठ्या सुट्टीवर गेल्यामुळे व सही साठी उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत त्यामुळे त्वरित तळेगाव शहरात 24 तास उपस्थित असणारा मुख्याधिकारी शासनाने उपस्थित करावा अन्यथा हा भोंगळ कारभार असाच वाढत राहणार असल्याचे प्रतिपादन प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी केले आहे.