कृषीवार्ता

क्षारपड जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही शेतकऱ्यांच्या समोरची गंभीर समस्या -ना.जयंतराव पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.२३ प्रतिनिधी
क्षारपड जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही शेतकऱ्यांच्या समोरची गंभीर समस्या बनत चालली आहे. आपण आपल्या विभागातील पाच गावातील क्षारपड जमीन पिकवू करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जल संपदा विभागाच्यामार्फत हाती घेतला आहे. या प्रकल्पात जमिनीचे क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा,असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथे ना.पाटील यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता बापूसो गाडे,कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्य क्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील,संचालक पै.भगवान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
ना.पाटील म्हणाले,आपला लोक प्रतिनिधी म्हणून मी आपल्या भागातील एक गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही योजना आणली आहे. इस्लामपूर येथील २१०३ एकरावर हा प्रकल्प राबविला जाणार असून १८८३ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पात एकरी ९४ हजार ६०० खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांनी २० टक्के म्हणजे १७ हजार ३७० रुपये भरावयाचे आहेत. उर्वरित ८० टक्के खर्च शासन करणार आहे. आपण स्थानिक पातळीवर समित्या तयार करून शेतकऱ्यांशी संपर्क व संवाद करा. लाभार्थी शेतकऱ्यांची रक्कम तातडीने जमा करावी, म्हणजे आपण लगेच हे काम सुरू करू. स्थानिक समित्यांनी कामाच्या दर्जावर लक्ष देत भविष्यात देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ही पहावी लागेल.
बापूसाहेब गाडे म्हणाले,आम्ही आता पर्यंत राज्यात ९०० चर काढल्या आहेत. मात्र ही पहिली भूमिगत चर आहे. या प्रकल्पास जास्त आयुर्मान मिळणार आहे. प्रिया लांजेकर म्हणाल्या,या प्रकल्पातून दोन पिढ्यांचा जमिनीचा प्रश्न सुटणार आहे. आपल्या आजारी पडलेल्या काळ्या आईची तब्येत सुधारण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा.
पै.भगवान पाटील म्हणाले,ना.जयंतराव पाटील यांनी पूर्वीही क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची जमीन पुन्हा चांगली पिकवू होत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे संपर्क दौऱ्यात आपल्या भागात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविण्याची मागणी केली होती.
युवा शेतकरी संदीप पाटील,शिव छत्रपती पुरस्कार विजेते पोपट पाटील, युवराज पाटील (नाना),वसंतराव पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारत अधिक माहिती करून घेतली.
प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार प्रदीप उबाळे,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,माजी संचालक शंकरराव पाटील, बाळासाहेब पाटील (धनी),कृष्णेचे संचालक संजय पाटील,मानधन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील,आनंदराव मलगुंडे, श्रीमती सुनीता सपकाळ, अँड.संपतराव पाटील,शैलेंद्र पाटील, सुभाषराव पाटील, शेतकरी संघटनेचे आप्पासाहेब पाटील, विलास बिरु ताटे,उपअभियंता राहुल घनवट,राजेंद्र गाजी,राजारामबापू साखर कारखान्याचे इरिगेशन ऑफिसर डी.एम. पाटील,जे.बी.पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
प्रारंभी तरुण शेतकरी संजय वसंतराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सर्जेराव कांबळे यांनी आभार मानले. आनंदराव इंगळे यांनी सूत्र संचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!