नेर्ले (ता. वाळवा ) ताकारीत एकावर खूनी हल्ला : पाचजणांवर गुन्हा दाखल.
सविस्तर असे कि, पोलिसांच्या खबऱ्या असल्याच्या संशयावरून तुपारी येथील प्रदीप विरसिंग जाधव (वय २०) याच्यावर चाकू व लाकडी दांडक्याने खूनी हल्ल्याची घटना घडली. याप्रकरणी विक्रांत बापु क्षिरसागर, प्रतिक जगन्नाथ क्षिरसागर, अशिष उत्तम कांबळे, अक्षय जगन्नाथ क्षिरसागर, बंड्या (पुर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. ताकारी ता. वाळवा) यांच्यावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास प्रदीप जाधव हा ताकारी एसटी स्टॅण्ड येथे कामानिमित्त गेला होता. त्यावेळी विक्रांत क्षिरसागर याने प्रदीपची कॉलर धरून तु पोलिसांना आमच्याबद्दल खोटया बातम्या देवुन आम्हाला अडकवतोस, मी कोण आहे तुला माहीत आहे का ?, थांब तुला ठारच मारतो असे म्हणुन कंबरेस खवलेला चाकू बाहेर काढून त्याने प्रदीपच्या डोक्यात दोन तीन ठिकाणी वार करुन त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशिष कांबळे याने काठीने मारहाण व इतरांनी शिवीगाळ करत लाथाबुक्कयांनी मारहाण केली. याबाबतची फिर्याद सुवर्णा जाधव त्यांनी दिली आहे. अधिक तपास स.पो.नि. प्रविण सांळुखे करत आहेत.